कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट   

पुणे : निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वार्‍याच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक स्थिती कायम आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. आज (मंगळवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याने ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. 
 
खालच्या स्तरातील वार्‍याची द्रोणीय रेषा ही मध्य महाराष्ट्रात असलेली चक्रीय स्थिती पासून रायलसीमापर्यंत आहे. आज (मंगळवारी) कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज ऑरोज अलॅर्ट देण्यात आला आहे. 
 
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलॅर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पावसाळी वातावरण कायम असल्यामुळे कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय घट झाली आहे. हवेत गारवा पसरला असल्याने उकाडाही गायब झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मान्सून प्रगतीपथावर 

नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) दक्षिण अंदमान, मालदिव, कोमोरीन क्षेत्राच्या आणखी काही भागात तसेच दक्षिण व मध्यम बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, उत्तर पूर्व बंगालच्या काही भागात सोमवारी दाखल झाला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण कायम असल्याने हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल सुरू आहे. पुढील चार दिवसांत तो देवभूमी केरळात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 
 

Related Articles